पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे.
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अतिशय भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १३ जण गंबीर जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पल्लवी म्हणाली की, मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका...यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा...ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असं दहशतवादीने सांगितले, असं पल्लवी यांनी सांगितले.
मंजुनाथ अन् पल्लवीचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.
J&K : पहलगाम में आतंकी हमले में मारे गए कर्नाटक के मंजूनाथ की आखिरी Video
यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे देखील जम्मू काश्मीरला गेल्या होत्या. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात येण्याची तत्काळ सोय करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
रूपाली ठोंबरे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी दोन दिवसांपूर्वी श्रीनगरला आले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी मी जाऊन आली आहे. सर्वजण खूप घाबरलेले आहेत. नाशिकचेही काही पर्यटक आमच्यासोबत आहेत. आम्ही सुरक्षित आहोत. मात्र, आम्हाला इथून निघण्यासाठी आम्हाला विमान असणं गरजेचं आहे. तो प्रकार घडला त्याठिकाणी काल आम्ही जाऊन आलो आहोत.
त्या ठिकाणची परिस्थिती आणि ज्याच्यांवर हल्ला झाला त्यांच्या परिस्थितीचा आम्ही विचारही करू शकत नाही. इथे हल्ला झाला हे जरी असलं तरी याठिकाणी काम करणारा स्टाफमध्ये अनेक मुस्लीम बांधव आहेत. आम्हाला एका आदील नावाच्या व्यक्तीने मोठी मदत केली. ते आजही आमची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. माझी सरकारकडे विनंती आहे की, तुम्हाला जी कारवाई करायची आहे, ती करा पण पर्यटकांना त्यांच्या घरी तातडीने पोहचवण्याची तयारी करा.
इथे परिस्थीती बिकट आहे. अनेक लहान मुले आमच्यासोबत आहेत. ते सेफ नाहीत. मी माझ्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून विमानाची सोय करून द्या अशी विनंती केली आहे. तातडीने सर्व मदत करून द्यावी, पर्यटकांना लवकरत लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे, असंही ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मिरमध्ये येत असतात. यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. पण बऱ्याच काळानंतर काश्मिरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.
महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू-
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा